कृषी व व्यापार
अचानक पाउस आल्याने शेतकरींचे हाल ,पिक वाहुन नेन्यास कसरत करावी लागत आहे.
सचिन वखारे :-
बदापूर, ता. येवला : पावसाने खंड दिल्यानंतर शेतकऱ्यांनी मजुरांची उपलब्धता करून सोयाबीनची सोंगणी करून ठेवली. मात्र अचानक पाऊस आल्याने ही सोयाबीन पावसातच भिजले आहे. एकीकडे शिवारात पाणी तुंबलेले असताना चिखल ॅतुडवीत शेतकऱ्यांना सोयाबीन शिवाराच्या बाहेर काढावे लागत आहे. येथील शेतकरी बाजीराव देवडे यांच्या शेतात सोयाबीन वाहून नेण्याची सुरू असलेली कसरत.