शेतकरी संघटनेची बुलुंद अशी मैदानी तोफ आज अनंतात विलीन…
शेतकरी संघटनेची बुलुंद अशी मैदानी तोफ आज अनंतात विलीन….
मनोहर देसले [ निफाड तालुका प्रतिनिधी]
शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक
कवी संदिप जगताप यांनी नानांच्या कर्तृत्वाचा आलेख मांडला व खासदार राजूशेट्टी साहेब यांच्या सोबत माधव नानांचे संबंध किती निकटचे होते यावर प्रकाव टाकला..कविवर्य लक्ष्मण महाडिक सर यांनी ही आपल्या शब्द सुमनांनी आलेल्या मान्यवरांनी थोडक्यात श्रद्धांजली अर्पण करण्याविषयी सांगितले…
१९८० च्या दशकात ज्यांच्या कर्तृत्वाने ओळखले जाते असे शेतकरी संघटनेचे पितामह स्व.माधवराव खंडेराव मोरे अर्थात शेतकऱ्यांचे पंचप्राण म्हणजे माधवनाना यांच आज दु:खद निधन झालं. आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना एक मोठा धक्का बसला. स्व.शरद जोशी साहेब यांनी उभी केलेली शेतकरी चळवळ महाराष्ट्रभर पोहचवण्यासाठी व संघटना बळकट करण्यासाठी नानांनी खूप मोठे काम केले.अनेकदा पोलीसांच्या लाठ्या काठ्या खाल्या,गोळी बारही झाला परंतु नानांनी कधीही मैदान सोडून पळ काढला नाही अशा कर्तृत्ववान नेत्याला आज श्रद्धांजली वाहिली त्यात प्रामुख्याने श्री.भास्कर नाना बनकर [ माजी सरपंच] यांनी श्रद्धांजली वाहतांना विविध प्रसंगही सांगितले व नानांचे पिंपळगाव बसवंत या नगरीत भव्य दिव्य स्मारक उभे करावे अशी भावना व्यक्त केली. तसेच श्रद्धांजली वाहतांना काही मान्यवर …ललित भाऊ पगार, रामचंद्र बापू,नानासाहेब बोरस्ते[माजी शिक्षक आमदार], नितीन ठाकरे [म.वि.प्र.स.],डॉ.सुधीर तांबे [पदवीधर शिक्षक आमदार], निफाड तालुक्याचे आमदार मा.दिलीप काका बनकर, खासदार सौ.भारतीताई पवार [आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य ] अशा विविध मान्यवरांनी आप आपल्या शब्दात श्रद्धांजली वाहिली व सर्वांनी शेवटी पुष्पचक्र अर्पण केले या प्रसंगी कविवर्य माजी प्राचार्य लक्ष्मण महाडिक सर शेतकर्यांवर लिहिलेली कविता त्यांनी स्वतः सादर केली….