ताज्या घडामोडी

कवठेसार मराठा समाजात जल्लोषी वातावरण,

कवठेसार मराठा समाजात जल्लोषी वातावरण, कवठेसार प्रतिनिधी: मराठा समाज चार महिने आंदोलनाची भूमिका घेऊन रस्त्यावर उतरलेला होता. कुणबी दाखला व इतर मागण्यासाठी लेखी हमी साठी उपोषण करत होते. पण जरांगे पाटील व सर्व मराठा समाज एकनिष्ठ ने लढून सरकारी राजपत्र द्वारे सर्व मागणी पूर्ण करून घेतली. शेवटी जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याचा विचार केला आणि तो प्रयत्न पूर्ण केला. माननीय मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या विषयावर तातडीने कुणबी दाखला शोधून लवकरात लवकर देण्यासाठी गतिमान कार्य केले. यामुळे मराठा समाजाच्या अनेक समस्या पूर्ण होणार आहेत. गावात जल्लोषी वातावरण निर्माण होऊन फटाकड्यांची आतिषबाजी व पेढे साखर वाटली. मराठा समाजातील पदाधिकारी व इतर सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन जल्लोष केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!