ताज्या घडामोडी

मानोली येथे अतिदृष्टी वादळी पावसामुळे दोन घरांची छप्पर उडून गेली.

मानोली येथे अतिदृष्टी वादळी पावसामुळे दोन घरांची छप्पर उडून गेली.

प्रतिनिधी: दीपक कांबळे मांजरेकर

मानोली तालुका शाहूवाडी, येथील विजय यशवंत कांबळे व सूर्यकांत यशवंत कांबळे, या दोन सख्ख्या भावांच्या घराचे छप्पर अति वादळी पावसामुळे उडून गेले. तसेच पावसाने घराच्या भिंती सुद्धा पडल्या.व त्यामध्ये असलेले संसारोपयोगी साहित्य त्यांचे पावसात भिजून जवळजवळ दहा लाखाची नुकसान झाले आहे.
आंबा मानोली परिसरात, गेली चार-पाच दिवस झाले जोरदार पाऊस पडत आहे, बुधवारी दिनांक 24 रोजी विजय यशवंत कांबळे व सूर्यकांत यशवंत कांबळे यांचे कुटुंब घरी झोपले होते, सकाळी पहाटे अचानक जोरदार वाऱ्यासकट पावसालाही सुरुवात झाली, अचानक चक्रीवादळाचा वेग यांच्या घराकडे आला व त्यामध्ये दोन्ही घराचे पत्रे व लोखंडी अँगल चा सांगडा वादळाच्या वेगाने उडून दुसऱ्यांच्या घरावर जाऊन पडला. या सर्व आवाजाने गावातील नागरीक आरडा ओरडा करू लागले. नागरिकांनी पहिल्यांदा विजय व सूर्यकांत यांच्या घरातील लहान मुलांना बाहेर काढले. वाऱ्याचा जोर व वेग एवढा होता की यामध्ये चिरांच्या भिंती सुद्धा पडल्या.
सुदैवाने यामध्ये काही जीवित हानी झाली नाही व या घटनेतून चार मुले बसवली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!