ताज्या घडामोडी

समता नगरातील तरुणाने तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी!

समता नगरातील तरुणाने तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी!

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील समता नगरात राहणाऱ्या तरुणाने महाबळ परिसरातील एका बांधकामच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी 6 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कांतीलाल मोहन पवार ( वय-२८) रा. समता नगर असे मयत झालेले तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कांतीलाल पवार आई, पत्नी, व तीन वर्षाच्या मुलगा यांच्यासहा वास्तव्याला होता. हातमजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान मंगळवार ६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता महाबळ येथुन आईसोबत येत असताना आईला दुकानावर जातो असे सांगून गेला. त्यानंतर महाबळ परिसरातील त्र्यंबकनगरातील बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. यात त्याच्या जागीच मृत्यू झाला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता तपासणी अंतिम वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन विसपुते यांनी मयत घोषित केले. कांतीलालचे आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. ईकलुता भाऊ गेल्याने बहिणीच्या रुग्णालयात प्रचंड आकाश केला होता. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईंची मोठी गर्दी जमली होती. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाणे अक्समत मृत्यू नोंद करण्यात आले. कांतीलाल याच्या पश्चात आई उषाबाई, पत्नी राणी, मुलगा जयेश ( वय-३) आणि तीन बहिणी असा परिवार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!