कातळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच शब्बिर नाचरे व ग्रामसेवक उदय पानारी यानी आपली फसवणूक केली असून त्याच्या चौकशीची मागणी गावचे सामाजिक कार्यकते गरीश कांबळे यांनी केली आहे..
कातळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच शब्बिर नाचरे व ग्रामसेवक उदय पानारी यानी आपली फसवणूक केली असून त्याच्या चौकशीची मागणी गावचे सामाजिक कार्यकते गरीश कांबळे यांनी केली आहे…..
प्रतिनिधी :किरण मस्कर कोल्हापूर
गगनबावडा तालुक्यातील कातळी ग्रामपंचायत ही ग्रुप ग्रामपंचायत असून या पंचायतीला, लखमापूर, नरविली, तळीचे खुर्द, व कातळी अशी गावे आहेत.गावामध्ये कैलासवासी गिताबाई सखाराम कांबळे राहत होत्या. त्यावेळचे गावच प्रतिष्ठीत माजी सरपंच दौलतराव विठोबा पाटील यांनी गिताबाई याच्यांकडे गावाला पाणी पुरवठा व्हावा म्हणून १ गुंठे जमिन तोंडी घेतली याबाबत कोणताही लेखी करार झाला नसल्याने सदरची जमिन ही आता गिताबाई यांचा मुलगा जो कामानिमित मुंबई मध्ये राहतो तो गिरीश कांबळे यांच्या नावावर राहीली. त्यानुसार गिरीश कांबळे
याने ग्रामपंचायतीला आपल्या जागेमधून स्विच टाँवर काढवण्याची मागणी केली. पण ग्रामसेवक उदय पानारी, उपसरपंच शब्बीर नाचरे यांनी गिरीष काबळे यांना आर्थिक अमिष दाखत. तुला मोबाइल टाँवर ला परवानगी देतो, तसेच शासनाच्या फंडामधून जनावरांचा गोठा देतो. व गावात बियर शॉपीला परवानगी देतो. असे सांगितले पण यापैकी एकही गोष्ट यांनी पूर्ण न केल्याने आज अखेर गिरीष कांबळे यांनी ग्रामसेवक व उपसरपंच याच्या कामाला पाडाच वाचला,,, ग्रामसेवक व उपसरपंच यानी जुन्या शौचालयाला कालर करून पैसे उचलले आहेत. एकाच पाण्याच्या जॅकवेलवर दोन वेळा नवीन स्कीम दाखवली आहे.तसेच मला प्रधानमंत्री आवास मधून घर मिळाले आहे त्याचा चेक काढण्यासाठी उपसरपंच शब्बीर नाचरे यांनी पैशाची मागणी केली. तसेच घर नावावर लावतो, तु आम्हाला सदर जागेचा दस्त करुन दे. अशी मागणी ग्रामसेवक पानारी व उपसरपंच नाचरे करत आहेत. तरी या दोघाच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी गिरीश कांबळे यांनी केली आहे.. गिरीष कांबळे (सामाजीक कार्यरते,काथळी)