कोर्ट मॅरेज कायद्यात सुधारणा व्हायलाच हवीच..कोर्टमॅरेजमध्ये दोन्ही पार्टीचे आई-वडिलांची साक्ष अनिवार्य करावी.
कोर्ट मॅरेज कायद्यात सुधारणा व्हायलाच हवीच..कोर्टमॅरेजमध्ये दोन्ही पार्टीचे आई-वडिलांची साक्ष अनिवार्य करावी.
आई-वडिलांचे घर म्हणजे धर्मशाळा नाही.उत्तम संगोपन करून प्रौढत्व पत्करल्या बरोबरच आई-वडिलांचा मान राखला गेला पाहिजे. मनात आले की एखाद्या सोबत पळून गेली की विसरून जाऊन इज्जतची माती करावी ही मानसिकता घातक आहे.आई-वडील आपल्या आयुष्याची संपूर्ण कमाई मुलांचे शिक्षण आणि करिअर घडवण्यात घालवतात.
स्वतः फाटलेले,जुने कपडे घालतात.चांगले अन्न खात नाहीत.ते स्वतः दूध,तूप खात नाहीत.पण मुलांसाठी सर्व काही करतात.पण मुलं मोठी होऊन पायावर उभी राहिली की,आई-वडिल सहसांभाळ करणाऱ्या पालकांना लाथाडून, एखाद्या सोबत प्रेमात पडल्यावर,आई बाबांना रडते सोडून पळून जातात.समाज, कुटुंब,गाव कोणाला तोंड दाखवायला जागा नाही.पालक टेन्शनला बळी पडून आजारांना बळी पडतात आणि निम्म्या वयातच त्यांचे आयुष्य संपते. सहज कायद्याचा अभ्यास करत असताना मनात आले आहे.तसेच यामुळे सध्या चालू असलेल्या लव्ह जिहाद प्रकरणाला आळा बसेल.
तरी तुम्ही या मताशी सहमत असाल तर तुमच्या सर्व ग्रुपवर शेअर करा म्हणजे सरकारचे डोळे उघडतील आणि आई-वडिल,पालकांना कोर्ट मॅरेजमध्ये को-व्होटिंग पेपर असण्याच्या कायद्यात सुधारणा देखील होईल.
ॲड.पंडित आर. जाधव.