वसई विरार जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सरचिटणीस निलेश राणे यांच्या प्रयत्नांना यश*
*वसई विरार जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सरचिटणीस निलेश राणे यांच्या प्रयत्नांना यश*
*सततच्या पाठपुराव्यामुळे नुकसानग्रस्तांना मिळणार नुकसान भरपाई*
*सुहास पांचाळ / पालघर जिल्हा प्रतिनिधी*
वसई / दि. २१ : वसई तालुक्यात सन २०१९ मध्ये सततच्या पावसामुळे चार वेळा पुर येऊन गेला.त्यावेळी नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरून अतोनात नुकसान झाले. तेव्हा त्यावेळी शासनाने नुकसान ग्रस्त नागरिकांना पूरग्रस्त निधी जाहीर केला.तो निधी काहींच्या पारड्यात पडला. तर काही डोळे लावून वाट पहात होते; परंतु तो निधी त्यांना मिळाला नाही.
त्यांची ही व्यथा पाहून व त्या पूरग्रस्त नागरिकांचे म्हणणे ऐकून भारतीय जनता पार्टी, ओबीसी जिल्हा मोर्चाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी संबंधित विभागांना शासन दरबारी पत्र तसेच तहसिलदार वसई यांनाही पत्र लिहून सतत पाठपुरावा केला. त्या संदर्भातील पत्रही देण्यात आले.
अखेर त्यांच्या या प्रयत्नांना तीन वर्षांनी यश आले वसई तहसीलदार कार्यालय यांनी सन २०२१ मध्ये ११३३ कुटुंबिय बाकी असल्याचे सांगण्यात आले.प्रत्यक्ष १४३३ कुटुंबियांना सध्या नुकसान भरपाई मिळत आहे.अजूनही नागरिक ह्या भरपाई पासून वंचित आहे. त्या संदर्भात आज श्री. निलेश राणे यांनी तहसीलदार श्रीमती. उज्ज्वला भगत यांची प्रत्यक्ष भेट घेतली व ८० कुटुंबियांची यादी
त्यांच्याकडे सुपूर्द करून त्याकामी आपण त्यांना लवकरात लवकर निधी मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.
या संदर्भात शासनाकडे अशी अपूर्ण यादी कोणी पाठवली? उरलेल्या नागरिकांचा पंचनामा का केला गेला नाही ? त्यासाठी जबाबदार कोण? असे प्रश्न देखील उपस्थित होतात.
जो पर्यंत शेवटच्या नुकसानग्रस्त गरीब नागरिकांच्या खात्यात निधी पोहचत नाही. तो पर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही असे जिल्हा सरचिटणीस श्री. निलेश राणे यांनी सांगितले.