ताज्या घडामोडी

सुपर ५० उपक्रमात यंदाच्या वर्षी ११० विद्यार्थी होणार निवड* *२१ जुलै रोजी होणार निवड चाचणी, १५ जुलै पर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख*

*सुपर ५० उपक्रमात यंदाच्या वर्षी ११० विद्यार्थी होणार निवड*
*२१ जुलै रोजी होणार निवड चाचणी, १५ जुलै पर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख*

नाशिक : जिल्हा परिषदेच्या वतीने मागील वर्षी राबविण्यात आलेला सुपर ५० हा उपक्रम यावर्षीही राबवण्यात येत असून यासाठी विद्यार्थ्याना ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करण्यास १५ जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. २१ जुलै 2024 रोजी यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी यामध्ये जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.
शैक्षणिक वर्ष सन २०२४ -२५ व २०२५ -२६ या दोन वर्षांसाठी सदर उपक्रमास एकुण ११० विद्यार्थ्यांची (५५ जेईई’ साठी व ५५ ‘नीट’ साठी) उपक्रमाच्या निकषाच्या आधारे निवड करण्यात येणार आहे. यापूर्वी प्रवेश अर्ज सादर करण्याचे मुदत ७ जुलै पर्यंत देण्यात आली होती तर १४ जुलै 2024 रोजी परीक्षा घेण्यात येणार होती मात्र विद्यार्थ्याचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता जिल्ह्यातील पात्र विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी जिल्हा परिषदेकडून ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित नियोजनानुसार ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करण्यास १५ जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. २१ जुलै 2024 रोजी सकाळी ११ ते १.३० यावेळेत यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निशुल्क निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यात येणार आहे निवड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन गुगल फॉर्मद्वारे प्रवेश अर्ज सादर करावा लागणार आहे. ज्या विद्यार्थ्याना ऑनलाइन अर्ज भरता येणार नाही त्यांनी तालुक्याच्या गट शिक्षण अधिकारी कार्यालयात जावून ऑनलाइन प्रवेश अर्जभरून घ्यावयाचा आहे.
‘जेईई’ अभ्यासक्रमासाठी फिजिक्स, केमिस्ट्री, गणित व इंग्रजी यात मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार असून ‘नीट’ अभ्यासक्रमासाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी व इंग्रजी यात मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे.
यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, गणित व इंग्रजी या विषयांवर प्रत्येकी २५ प्रश्न असून प्रत्येकी २५ गुण असणार आहेत. विद्यार्थ्यांना आपले बैठक क्रमांक हे जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असून प्रत्येक तालुकास्तरावर परीक्षा केंद्र असणार आहे. या उपक्रमाच्या नियम निकषान्वये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शासकीय, अनुदानित, अंशतः अनुदानित विद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!