ताज्या घडामोडी

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सरकार दलित विरोधी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठव

भारती धिंगान प्रतिनिधी (नाशिक)
मुंबई दि. 27 – बिहारमधील गोपालगंज जिल्हयाचे जिल्हाधिकारी आय.ए.एस. अधिकारी जी.कृष्णय्या यांची हत्या करुन जेलमध्ये शिक्षा भोगत असणारे आनंद मोहन सिंह यांची जेलमधुन सुटका करण्याचा निर्णय बिहार राज्य सरकारने घेतलेला आहे. हा निर्णय अत्यंत निषेर्धाह आहे. या निर्णयामुळे
मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे राज्य सरकार दलित विरोधी ठरलेले आहे अशी टीका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी बिहार चे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर केली आहे.

बिहार राज्य सरकार ने जेल नियमावली मध्ये दुरुस्ती केल्यामुळे आनंद मोहन सिंह यांच्यासह 27 कैद्यांची सुटका होणार आहे. आनंद मोहन सिंह याने 1994 मध्ये दलित आय ए एस अधिकारी जी कृष्णय्या यांची हत्या केल्या च्या आरोपातून जेल मध्ये जन्मठेप शिक्षा भोगत आहे. त्यामुळे
आनंद मोहन सिंह या गुन्हेगाराला जेल बाहेर काढण्याचा निर्णय हा दलितांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखा निर्णय आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या या निर्णयाचा आम्ही तीव्र निषेध करतो. हा निर्णय नितीश कुमार यांनी त्वरीत रद्द करावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. प्रसिद्धीप्रमुख हेमंत रणपिसे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!