ताज्या घडामोडी

महामार्गावरील चौफुल्यांना मिळणार झळाळी अपघात नियंत्रणासाठी राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण सरसावले

फोटो

महामार्गावरील चौफुल्यांना मिळणार झळाळी

अपघात नियंत्रणासाठी राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण सरसावले

प्रतिनिधी —– –
दिवसेंदिवस वाढणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण (एनएचआय) सरसावले असून मुंबई- आग्रा महामार्गावरील चौक अपघातमुक्त करण्यासाठी उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात विल्होळी,रायगड नगर, वाडीव्हरे,चौकातील कामे करण्यातआली आहे. कॉक्ट्रीकरणासह पांढरे पट्टे मारल्यामुळे आणि ब्लिंकर,डेलिनेटर,
मिडीयन मार्कर बसविल्याने चौकात झळाळी मिळाली आहे.
महामार्गावरील चौकामधील पांढरे पट्टे अस्पष्ट झाल्यामुळे वाहन धारकांना अंदाज येत नाही परिणामी, अपघातच्या घटना घडतात.याबाबत स्थानिक नागरिकांसह अनेक वाहन धारकाच्याही तक्रारी होत्या.दिवसेंदिवस घडणाऱ्या अपघाताच्या घटना व तक्रारी लक्षात घेऊन राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण महामार्गा
वरील चौकामध्ये पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरु केले आहे.पहिल्या टप्प्यात महामार्गावरील रायगड नगर,विल्होळी, वाडीव्हरे,जैन मंदिर चौकात पांढरे पट्टे मारल्यामुळे चौकात झळाळी आली
असून अपघाताच्या घटनांना आळा बसू शकेल.अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.पांढऱ्या पट्ट्यांमुळे वाहन
धारकांना लेन पाळणे सोयीचे ठरणार आहे. तसेच चौकामध्ये वाहनांच्या वेगावरही नियंत्रण येऊ शकणार आहे.पादचाऱ्यांसह स्थानिक वाहनधारकांना रस्ता ओलांडणेही आता सोपे होणार आहे.या परिसरातील नागरिकांना या उपक्रमाचे कौतुक केले आहे.अपघात रोखण्या
साठी महामार्गा वरील
सर्वच चौफुल्यावर अशा प्रकारे पांढरे पट्टे व वाहतुकीबाबत सूचना
फलक लावण्यात येणार आहे.सर्वच चौकांना मिळावी झळाळी अशी मागणी वाहन धारकानी केली आहे.या उपक्रमांचे वाहनधारका सह पादचाऱ्यांनी कौतुक केले आहे.
—–
कोट
महामार्गावर अपघात वाढले आहेत. हे टाळण्यासाठी रोड सेफ्टीची कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.वोल्होळी चौकातील कामानंतर अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. अन्य ठिकाणीही लवकरच कामे केली जाणार आहेत.
भाऊसाहेब साळुंखे, एनएचआय प्रकल्प संचालक
——-

कोट
रोड सेफ्टीची कामे ठेकेदारामार्फत व्यवथितपणे करून घेतली जात आहेत. पिपळगांव ते गोंदे दरम्यान सुमारे 9 चौफुलया आहेत. यापैकी जिथे नेहमी अपघात घडतात,तेथील कामांना प्राधान्य दिले जाणार आहे एकूणच, झिरो अपघाताचे आमचे उध्दिष्ट आहे.
दिलीप पाटील,
एनएचआय मॅनेजर टेक
बिल्डर्स
————-
कोट
प्राधिकरणाकडून आलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन करून कामे ठरलेलया वेळेत आणि दर्जेदार करण्याकडे विशेष लक्ष आहे. कामेब् करताना वाहनचालकांची गैरसोय होणार नाही. याचाही दक्षता घेतली जाते.
भूषण शिंदे,
संचालक जयहिंद बिल्डर्स

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!