भारतीय जनतेसमोर कितीही डोकं फोडले, तरी मतदानाचा टक्का फारसा वाढत नाही. त्याकरीता सर्वोत्तम पर्याय
भारतीय जनतेसमोर कितीही डोकं फोडले, तरी मतदानाचा टक्का फारसा वाढत नाही.
त्याकरीता सर्वोत्तम पर्याय म्हणजे ज्यावेळेस आपण मतदान करतो तेव्हा ,जी व्यक्ती मतदान करेल तिला मतदान केल्याचे व्हिजीटींग कार्डसारखे एक छोटेसे प्रमाणपत्र दयायचे आणि ते प्रमाणपत्र पुढील निवडणुकीपर्यंत सर्व शासकीय योजना,सर्व प्रकारचे अनुदान ,एस.टी प्रवासाच्या सवलती,पाल्याची स्कॉलरशीप,दवाखाने , शेतीवर आधारित सवलती या सर्वांसाठी आधारकार्डप्रमाणे आवश्यक करायचे .अर्थात ज्यांचेकडे मतदान केल्याचे प्रमाणपत्र असेल तोच पुढील पाच वर्ष शासकीय योजनेचा फायदा घेईल,अन्यथा नाही.
असे झाल्यास एकही मतदार मतदानापासून वंचित रहाणार नाही.ऊन असो,वारा असो ,पाऊस असो की ,स्वतः चे लग्न असो एवढेच नाही तर अंत्यसंस्कारालादेखील लोकं मतदान केल्याशिवाय जाणार नाहीत .
आणि हे विचार निवडणुक आयोगापर्यंत गेल्यास यावर विचार झाल्याशिवाय राहणार नाही .या करिता शक्य होईल तेवढे पुढे पाठवा म्हणजे कदाचित यावर विचार होऊ शकतो अजून निवडणुकीचे बरेच टप्पे बाकी आहेत. किंवा पुढच्या निवडणुकी पर्यंत तरी ह्या पद्धतीचा जरूर विचार होऊ शकेल .
– *मी, एक जागरूक भारतीय नागरिक