ताज्या घडामोडी

नाशिक जिल्हा ग्रंथालय विकास कार्यक्रम (रूम टू रीड इंडिया) अंतर्गत येवला तालुक्यातील उर्दू केंद्रात २७५० उर्दू बालसाहित्याचे वितरण*

*नाशिक जिल्हा ग्रंथालय विकास कार्यक्रम (रूम टू रीड इंडिया) अंतर्गत येवला तालुक्यातील उर्दू केंद्रात २७५० उर्दू बालसाहित्याचे वितरण

नाशिक जिल्हा ग्रंथालय विकास कार्यक्रम अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यातील ३२५९ जि. प. शाळेमधील इयत्ता १ ते ५ च्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिक, शिक्षण विभाग जि. प. नाशिक आणि रूम टू रीड इंडिया ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्हा ग्रंथालय विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी ऑक्टोबर २०१९ पासून ३१ मार्च २०२३ पर्यंत करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत रूम टू रीडने २४४ केंद्रस्तरीय ग्रंथालयाकरिता ४,२८,८७२ मराठी आणि ४५०० उर्दू बालसाहित्य पुरविले आहे.

नाशिक जिल्ह्यातील जि. प. च्या एकूण ३५ उर्दू शाळा असून उर्दू शाळेच्या विनंतीनुसार या सर्व उर्दू शाळांना प्रत्येकी २७५ उर्दू स्तरीकृत बालसाहित्य २३ व २४ मार्च २०२३ या कालावधीत वितरीत करण्यात आले असून या ३५ उर्दू शाळेंना एकूण ९६२५ पुस्तकांचे वितरण करण्यात आले. त्याच अनुषंगाने आज दि. २४ मार्च २०२३ रोजी येवला तालुक्यातील उर्दू केंद्रातील जि. प. उर्दू शाळा मुली नंबर १ येथे केंद्रातील जि. प. च्या सर्व १० शाळेंना उर्दू माध्यमातील प्रत्येकी २७५ अशाप्रकारे एकूण २७५० पुस्तकांचे वितरण करण्यात आले. या बालसाहित्याचे वितरण मा. श्री. शिवाजी औटी साहेब (जेष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नाशिक), मा. श्री. शिवकुमार केदारी साहेब (महाराष्ट्र राज्य साक्षरता कार्यक्रम अधिकारी, रूम टू रीड इंडिया ट्रस्ट), मा. श्री. प्रशांत गायकवाड साहेब (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, येवला), मा. श्री. सुनिल मारवाडी साहेब (शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती, येवला), मा. श्री. राम कुळकर्णी साहेब (विषयसाधनव्यक्ती, शिक्षण विभाग, पंचायत समिती, येवला), मा. श्री. अशफाक शाह साहेब (केंद्रप्रमुख, उर्दू केंद्र, पंचायत समिती, येवला), मा. श्री. रविंद्र शेळके साहेब (केंद्रप्रमुख, सायगांव केंद्र, पंचायत समिती, येवला), श्री. आकाश ठोंबे (प्रकल्प कार्यकारी, रूम टू रीड इंडिया ट्रस्ट, येवला) यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात, उपस्थित मान्यवरांनी व केंद्रातील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी मार्गदर्शनपर आपले मनोगत व्यक्त करून या कार्यक्रमांतर्गत वाचन उपक्रम व पुस्तक देवाण-घेवाण प्रक्रियेतून विद्यार्थ्यांच्या भाषा कौशल्याचा विकास होण्यास मदत होत असून निपुण भारत व पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मिशनची ध्येय व उद्दिष्ठ्ये प्राप्तीसाठी देखिल खूप मदत होत असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमाचे फलित म्हणजेच प्रत्येक विद्यार्थी हा स्वतंत्र वाचक होण्यास मदत होत आहे, तरी हा कार्यक्रम अजून पुढे वाढवावा यासाठी देखिल सर्वांनी नमूद केले.

या बालसाहित्य वितरण सोहळ्याचे आयोजन केंद्रप्रमुख मा. श्री अशफाक शाह साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका शाकेरा शकील शेख व शाळेतील इतर शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने केले होते व साहित्य वितरण सोहळा आनंददायी वातावरणात पार पडला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!