राज्यात लवकरच शिक्षकांची भरती करून भरती मधील मागासवर्गीयांचा अनुशेष दूर करणार.- शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची स्पष्टोक्ती.
राज्यत लवकरच शिक्षकांची भरती करून भरती मधेल मागासवर्गीयांचा अनुशेष दूर करणार.- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची स्पष्टरोक्ती।
सुबोध सावंत -नवी मुंबई प्रतिनिधी
कोल्हापूर : राज्यात लवकरच शिक्षकों भरती करौं भरती मेंधील मागासवर्गीययांचा अनुशेष दूर केला जेल ऐसे क्षति शालेय शिक्षण मंत्री मा. ना.दीपकभाई केसरकर यानि कोल्हापूर येथील कास्त्रैब शिक्षक संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाच्या में दिले।
तसेच राज्यातील केंद्रप्रमुखांची रिक्त पदे ही शिक्षकांमधूनच 50% भरती केली जाईल असे आश्वासन दिले. महाराष्ट्रातील मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण दिले पाहिजे यासाठी आग्रहाची भूमिका मांडली .
कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या पहिल्या राज्य अधिवेशनासाठी उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण मंत्री मा. ना. दीपक भाई केसरकर बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याचा अभिमान वाटतोय कारण ही शाहू महाराजांची पवित्र नगरी आहे. राजश्री शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त शाहू महाराजांच्या विचारांचे आणि कार्यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनी त्यांनाही अभिवादन केले.
पुरोगामी महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारानेच आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे .महाराष्ट्र हे शिक्षणाच्या बाबतीमध्ये एक नंबरचं राज्य करण्याचा मनोदय यावेळी शिक्षण मंत्री महोदयांनी व्यक्त केला. कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सरचिटणीस आकाश तांबे यांनी यावेळी शालेय शिक्षण मंत्री मा.ना. श्री दीपकभाई केसरकर यांना गौतम बुद्धांची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला .तसेच श्री. दीपकभाई केसरकर यांच्या मागील ३० वर्षे पासून केलेल्या काही सामाजिक कार्याची आठवणी सांगितल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला बॅरिस्टर नाथ पै, प्राध्यापक मधू दंडवते, सुरेश प्रभू यासारख्या बुद्धिवंतांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे आणि या परंपरेचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम हे दीपकभाईच्या करत आहेत. राज्याला एक उत्कृष्ट शालेय शिक्षण मंत्री मिळाला त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना आम्ही धन्यवाद देतो. पुढील काळामध्ये शालेय शिक्षण मंत्री म्हणून आदरणीय दीपक भाई केसरकर हे आपला ठसा राज्यामध्ये उमठवतील आणि देशांमध्ये महाराष्ट्र हे शिक्षणामध्ये एक नंबरचे राज्य होईल यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटने कडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन आकाश तांबे यांनी दिले. श्री रविंद्र पालवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनामध्ये राज्यातील 25 गुणवंत शिक्षकांना शालेय शिक्षण मंत्री यांच्याहस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. नवीन शैक्षणिक धोरण 2020 यावर चर्चासत्र आयोजित केले होते यामध्ये मा. श्री. गिरीश फोंडे राज्य समन्वयक (शिक्षण वाचवा नागरिक कृती समिती) आणि श्री. महावीर माने (सेवानिवृत्त शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य) यांनी सहभाग घेतला. विभागीय उपसंचालक श्री. महेश चोथे यावेळी उपस्थित होते.
अधिवेशन में छत्रपति शाहू महाराजांच के अध्यक्षतेखाली झालेल्या ऐतिहासिक माणगाव परिषद के महत्व श्री बाबुराव कांबळे यानी आपल्या तार्किकांमधुन उसमें उपस्थित हुए। स्वागत अतिथि श्री नामदेवराव कांबळे यानि मान्यवरांचे स्वागत केले। या संपूर्ण घटना सूत्रसंचालन सिने अभिनेता निलेश खुले यानी केले तत् कोल्हापूर गिलह्याचे अध्यक्ष श्री गौतम वर्धन यानी सर्व मान्यवरांचे और उपस्थितों का आनंद लेते हैं। या अधिवेशनाला राज्यभरातून जवळपास 5000 शिक्षक बांधव उपस्थित होते हैं।
आकाश ब्रेज़ेन
सरचिटणीस
कास्त्रेब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य