वारकऱ्यांच्या सेवेमुळे आत्मिक समाधान मिळते : संतोष वाणी आप्पा
वारकऱ्यांच्या सेवेमुळे आत्मिक समाधान मिळते : संतोष वाणी आप्पा
देश विदेशातून अनेक राज्यात श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी या आराध्य दैवत भेटण्यासाठी अनेक भागातून संत महाराजांच्या मानाच्या पालख्या पंढरपूरकडे रवाना होत असतात. प्रवासामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते राजकीय व्यक्ती वारकऱ्यांची सेवा करत असतात असेच एक सेवा हातकलंगले येते तारदाळ गावचे सरपंच यशवंत वाणी साहेब व त्यांचे कार्यकर्ते विशाल शिंदे, रोहित, मल्लिकार्जुन गायकवाड आणि सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये दिंडी चालक भाऊसाहेब जाधव, ज्योतीराम शिंदे व संतोष वाणी आप्पा यांनी दरेवाडी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर या गावच्या मानाच्या वारकऱ्यांना अल्पोपहार देऊन त्यांची सेवा केली. यावेळी बोलत असताना सरपंच यशवंत वाणी म्हणाले. माणसाला सुख आणि समाधान शोधायचा असेल तर जीवनात येऊन वारी करावी किंवा वारीत वारकऱ्यांची सेवा करावी. तसेच संतोष वाणी आप्पा म्हणाले वारकऱ्यांची सेवा केल्यामुळे आत्मिक आनंद आणि सुख प्राप्त होते त्याचा अनुभव म्हणजे साक्षात विठ्ठलाचे दर्शन होते सेवा करत असताना आमच्या हातून सेवा होते याचा सार्थ अभिमान वाटतो आहे.
यावेळी दरेवाडीचे वारकरी, प्रवासी राजाभाऊ वडा चे मालक उपस्थित होते.