ताज्या घडामोडी

उद्धव ठाकरेंनी स्वखुशीने राजीनामा दिला, दिला नसता तर सरकार पुन्हा आणलं असतं : सर्वोच्च न्यायालय…

उद्धव ठाकरेंनी स्वखुशीने राजीनामा दिला, दिला नसता तर सरकार पुन्हा आणलं असतं : सर्वोच्च न्यायालय…

सुबोध सावंत -नवी मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत आज सर्वोच्च न्यायालयानं निकाल जाहीर केला. यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं ठाकरे गटाला मोठा धक्का देत शिंदेंना दिलासा दिला आहे. त्यामुळे आता हे स्पष्ट होतंय की, शिंदे सरकार बचावलं आहे. याबाबत निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयने मोठं वक्तव्य केलं. उद्धव ठाकरे यांनी स्वखुशीनं राजीनामा दिला, त्यांनी राजीनामा दिला नसता, तर सरकार पुन्हा आणलं असतं, असं सर्वोच्च न्यायालयानं आपला निकाल जाहीर करताना म्हटलं आहे.

घटनापीठानं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या सर्व आमदारांच्या कृतीवर ताशेरे ओढले, पण घटनापीठाने आमदार अपात्र ठरवण्याचा निर्णय अध्यक्षांकडे सुपूर्द केला आणि शिंदे सरकार वाचलं. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आणखी महत्त्वाचं भाष्य केलं की, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर त्यांचं सरकार परत आणलं असतं. त्यामुळे सगळं चुकलं, पण शिंदे सरकार वाचलं, हाच या निकालाचा अर्थ आहे.

आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण
नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरवलेल्या 16 आमदारांबाबत सर्वोच्च मोठा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयानं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेणार असल्यामुळे, ते आमदार पात्रच आहेत यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR. Bharat Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!