कारण नसतांना रिक्षा चालकाला मारहाण रिक्षाचे नुकसान करुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कारण नसतांना रिक्षा चालकाला मारहाण रिक्षाचे नुकसान करुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहरातील तांबापुरा येथे काहीही एक कारण नसताना रिक्षाचालकाला शिवीगाळ व मारहाण केली तर रिक्षाच्य काचा फोडल्या नुकसान करून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ७:०० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, चंद्रकांत विष्णू अभंगे ( वय-३१) रा. कंजरवाड्यात जळगाव हा तरुण आपल्या परिवारास वास्तव्याला आहे. रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. गुरुवार २२ डिसेंबर रोजी चंद्रकांत अभंगे हा तरुण सकाळी ६:०० वाजता घरी असतांना काहीही एक कारण नसताना कलीम शेख पिक यांच्या इतर तिघांनी दारुच्या नशेत येवुन बेदम मारहाण केली. तर रिक्षाच्या काचा फोडल्या नुकसान केले. ही घटना घडल्यानंतर चंद्रकांत अभंगे याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून कलीम शेख फिक, अजंता सलमान, बाबा आणि खलील, सर्व रा. बिलाल चौक जळगाव यांच्या विरोधात गुरुवार २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ७:०० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.का नितीन पाटील करीत आहे.